गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!
गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!१९९२ ते १९९५ या काळात भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मध्ये शिक्षण घेत असताना श्री. गवळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. एकाचवेळी कर्तव्यकठोर मुख्याध्यापक, शाळेतील सर्वांसाठी प्रेमळ पालक, भूमिती आणि विज्ञान यांसारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे अशी विविध रूपे सरांमधे बघायला मिळाली.आम्हां ९५ च्या दहावीच्या बॅचवर सरांची विशेष नजर होती. आमच्यावर सरांनी खूप भरभरून प्रेम केले. शारदा उदावंत, सविता रेपाळे आणि विष्णू औटी यांची बॅच म्हणून आम्ही सरांच्या सतत लक्षात राहिलो. या विद्यालयात मला जवळपास अडीच वर्षे शिक्षक म्हणून काम करता आले. यावेळी सुद्धा अध्यापनासंदर्भात सरांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळत गेले. नंतर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना सर आवर्जून चौकशी करत असत.एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर सरांचं शेड्य...
