Tuesday, December 9

Story

जिद्दीची जादूची पेटी!
Story

जिद्दीची जादूची पेटी!

जिद्दीची जादूची पेटी!शंभर वर्षांपूर्वीची वैद्यकीय दुनिया आजच्या तुलनेत अगदी निराधार होती. विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. ती बाळं इतकी लहान, अशक्त आणि कुपोषित असायची की त्यांचं जगणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हातात कोणतंही प्रभावी साधन नव्हतं. त्या काळात जन्म झाल्यानंतर उष्णता टिकवू न शकणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं तर सरळ गमवावी लागायची. आणि या भयंकर परिस्थितीला, वैद्यकीय क्षेत्राने “हे नैसर्गिक आहे” असं मान्य केलं होतं.सगळेजण तेच मान्य करत असताना एक डॉक्टर मात्र या समजुतीशी पूर्णपणे असहमत होते डॉ. एतिएन टार्नियर. एके दिवशी त्यांनी शेतात कोंबडीला तिच्या अंड्यांना उब देताना पाहिलं, आणि त्याच क्षणी एक साधा पण विलक्षण प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जर कोंबडी उब देऊन अंड्यातील जीव वा...
व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!
Story

व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!

सत्तरचं दशक. जगभर शीतयुद्धाची धग. अमेरिका आणि रशिया—दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रत्येक क्षण सज्ज. त्या महासत्तांच्या खेळामध्ये एक छोटंसं गाव मात्र शांतपणे, आपल्या छोट्याशा समस्येसह जगत होतं. नाव व्हल्कन. अमेरिकेच्या नकाशावरून शोधल्याशिवाय सापडणारही नाही असं अगदी लहान गाव.१९५०च्या दशकात इथे कोळसा खाणींची गजबज होती. कामगारांची धावपळ, बाजाराची चहलपहल, घराघरांतले दिवे. पण खाणी बंद झाल्या आणि गाव जणू प्राणविहीन झालं. १९७०च्या आसपास तर इथे फक्त २० कुटुंबं उरली. नदीच्या काठावरचं, एकटं, शांत, आणि विस्मृतीत गेलेलं हे गाव.नदीचा एक भाग वेस्ट व्हर्जिनियात, तर दुसरा केंटकी राज्यात होता. मुलांना शाळेत जायचं म्हणजे नदी ओलांडावी लागायची. पण गावाचा जुना पूल तुटून पडलेला. त्यामुळे मुलांना रोज एक भीषण प्रवास करावा लागायचा लॉक केलेल्या रेल्वेच्या कुंपणावरून चढून, नंतर मालगाड्या धावतात त्...
आपण खरच कीती व्यस्त आहोत !
Story

आपण खरच कीती व्यस्त आहोत !

आपण खरच कीती व्यस्त आहोत !जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले.त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता.मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष ग...
मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!
Story

मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!

मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!आमच्या वेळेस शिदोरी बांधून पहाटे गेलेल्या बैलजोड्या सयसंध्याकाय होईपर्यंत घराकडे परतत नसायच्या. रस्त्यानं बैलगाडी घेऊन घरी येईस्तोवर दिवेलागण होऊन साजरा अंधार पडायचा. आम्ही बैलबंडीत गूडूप अंधारात बसलेलो. पण बैल मात्र सरावानं बरोबर घरालोक चालत चालत घरापर्यंत सुखरूप आम्हाले सोडायची. सुगीच्या दिवसात जंगलात जिकडे तिकडे कामासाठी माणसांची वर्दळही वर्दळ दिसायची.पशुपक्षीही भरपूर प्रमाणात सोबतीला असायचे.हरणाचे कळपच्या कळपं समोरून धावायचे.दुपारच्या सामसूम वातावरणात भोरी नावाचा पक्षी 'पोट दुखते' म्हणजे घुगुच घु असा स्वर, आवाज काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.टिटवीचा आवाज,कावळयाची कावकाव शांत आसमंतात नखोरा ओढायचा.एखादया दूरच्या शेतातल्या कडूलिंबाच्या झाडावर माकडं या फांदीवरून तर त्या फांदीवर मसत्या करायची.हूपहूप करत मोठय...
ती चिमणी… जी कधी विझली नाही!
Story

ती चिमणी… जी कधी विझली नाही!

ती चिमणी… जी कधी विझली नाही!मागच्या आठवड्यात गावी एक शेजाऱ्यांचे लग्न होते. त्या लग्नासाठी एकटाच गावी गेलो होतो. लग्न संध्याकाळचे होते. दुपारी घरात उन्हाने फार उकडत असल्याने बाजूला चिंचेच्या झाडाच्या सावलीला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बाजेवर सहज पडलो होतो. मधूनच मोबाईल चाळत होतो. उन्हाने आळस येऊन डोळ्यांवर झापड येत असायची. तेवढ्यात मला कुणीतरी दाराजवळ बोलत असल्याचा आवाज आला.                      "काय रं? कधी आला?" तिथे दिसत तर कुणी नव्हते. आणि मला 'आरे-तुरे' कोण म्हणत असावे? असा मला प्रश्न पडला. मी आपला इकडे-तिकडे बघत होतो. 'इथे भुताटकी तर नाही ना?' अशी शंका मनात येऊन गेली. कारण लहानपणी अनेकदा पिंपळाच्या, जुन्या वडाच्या, चिंचेच्या झाडांवर भुते असतात, हे अनेकदा ऐकलेले होते....
तीन वेळचे आमदार शेअर ऑटोमध्ये: वामनराव चटप यांचा साधेपणाचा धडा!
Story

तीन वेळचे आमदार शेअर ऑटोमध्ये: वामनराव चटप यांचा साधेपणाचा धडा!

काल रात्री मी वर्ध्याहून ट्रेनने बडनेरा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षाची वाट बघत उभा होतो. तेवढ्यात, एक रिक्षावाले एका सीनियर सिटीझनशी बोलताना दिसले. ते सीनियर सिटीझन म्हणाले, "मला चपराशीपुऱ्याजवळ सोडा." रिक्षावाले म्हणाले, "सौ रूपये होंगे!" ते सीनियर सिटीझन म्हणाले, "सौ रूपये आपको पुरता नही!" त्या ड्रायव्हरला ती गंमत वाटली.त्याने त्यांना निग्लेक्ट केलं. मग दुसरा ऑटावाला धावत आला. तो म्हणाला, "वो अंकल कहरे, देडसो दुगा!" त्या दोघांनाही ते गंमत वाटत होती; पण मला वाटले की ती गंमत नाही. मग, हळूहळू मी निरीक्षण केलं तर त्यांच्या छातीवर 'शेतकरी संघटना' 'स्वतंत्र विदर्भ राज्य' असे दोन बिल्ले मला दिसले. ते मला म्हणाले, "त्याला शंभर रुपयांत परवडणार नाही." मग मी त्यांना म्हणालो की, रिक्षावाल्यांना ही गंमत वाटते आहे! ते म्हणाले नाही, मला जायचं आहे ते ठिकाण आतमध्ये आहे. रिक्षावाल्या...
आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!
Story

आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!

आठवणीतील अय्युब; माणुसकीच्या नात्याचा हात!दुपारच्या सत्रात फोन खणानला.. नंबर सेव्ह नसल्याने मी बराच वेळ वाजणाऱ्या बेल कडे बघत होतो. ट्रु कॉलर ने त्याचं काम चोख बजावले होते. नंबर जरी अननोन असला तरी अयुब अयुब असं काहीतरी ट्रु कॉलर स्पष्टपणे दिसत होते. शेवटी अगदी शेवटचा आचका घेऊन मोबाईल बंद होणार त्या शेवटच्या क्षणाला कॉल रिसीव्ह केला. तिकडून आवाज आला.. कोण बाबासाहेब भहुहे का..? मी फक्त हं.. केलं भाऊ मी अय्युब बोलतोय...! मी आपला मेंदूला जरा जोर देत विचार करू लागलो की, कोण अय्युब यार..? खरं तर अय्युब कोण..? हे काही माझ्या लवकर लक्षात येईना. बरं समोरच्याला मी तुम्हाला ओळखत नाही असंही म्हणू शकत नव्हतो.. या सर्व विचारात काही सेकंदाचा वेळ गेला. आणि समोरून तोच व्यक्ती बोलता झाला.. कदाचित त्याला ही कळलं असावं की मी त्याला ओळखलं नाही.. पुन्हा तोच बोलता होत म्हणाला की, अरे हो.. तुम्ही कस्काय मला ध...
‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ
Story

‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ

'ताई कितीला दिला हा फडा?' ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " त्या रखुमाईल...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा
Story

नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा

"नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा"मंगयवारचा गावच्या आठवडी बजार असल्यानं,पायटीच रामभाऊनं ढोराईले गव्हाणीत आदल्या दिवशी कापून आणलेल्या गावरान कडावूचे धांडे लाकडावर कुऱ्हाडीनं बारीक गेंडुरे करून ढोराईपुढे टाकले व गवत कापाचे ईवे वयनाटीतून काढून घराजोळच्या नालीच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या खरपाच्या गोटयावर साजरे खराखरा घासले. तसा त्या खरपाच्या गोटयाचा उपयोग कोणाचे ट्रॅक्टर, आऊतभांडे,बैलबंडया, ढोरवासरं घराच्या ओट्याले शेंदून जाऊ नये म्हणून त्यानं नालीवर बरोबर बसवले होते. ओटयासमोर इलेक्ट्रीकचा लोखंडी पोल व त्या पोलच्या व भिंतीच्या बरोबर मधात इंधनकाडीसाठी वावरातून तोडून आणलेले मोठमोठे लाकडाचे फाटे व्यवस्थीत रचून ठेवलेले. समोर गाईवासराचे दोन खुटे दिवसभर रिकामेच असायचे.कारण गावचा दल्लारवाला म्हणजे ढोरं वयणाऱ्याकडं गाय, वासरू त्यानं हप्त्यावारी बऱ्याच दिवसांपासून टाकलेले. त्यामुळे दिवस...