समाजातील विस्कटलेली नाती…
बदलती जीवनशैली, जगण्याचा अतिउच्च दर्जा, तसेच मनामध्ये असलेला एकमेकांविरुद्ध होणारा गैरसमज हा नुसता विचार बदलवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला माणसा पासून दूर नेण्याचा प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष रीत्या प्रयत्न करीत असतो. खर तर आज समाजात सगळी कडे विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते आहे. या पद्धतीचा अवलंब होऊन नात्या मध्ये नुकताच खंड पडत नाही तर त्यामध्ये असलेल्या प्रेमाचा शेवट होतांना दिसतो आहे. मित्रांनो ही खरच खूप दुःखाची बाब आहे खर तर आपला भारत देश हा संस्कृतीने सजलेला आणि एकता निर्माण करणारा देश आहे परंतु आता मात्र या नात्याला नावच खोट वेष्टन लावलेलं दिसतंय.
आज दोन दिवसाचा लग्न करून आलेला मुलगा आपल्या बायको साठी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, धन संपत्ती साठी भावा भावाचे रक्ताचे नाते तुटताना दिसत आहे, तेवढंच नाही तर इस्टेट मिळवण्यासाठी एकमेका...