Monday, December 1

Article

Article

भारतमातेच्या हटवादी कुपुत्रांचा चेहरा उघड करणारा डॉ. युवराज सोनटक्के यांचा कवितासंग्रह: ‘ ‘प्रश्नांची मातृभाषा’..!

प्रश्नांची मातृभाषा'.. या कवितासंग्रहातील सगळ्याच कविता ताकतीच्या आहेत. ही ताकद पुरवणारे स्रोत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत आहेत. त्यांच्या विचारातून परिपक्व झालेला हा कवी या सर्व कवितेच्या माध्यमातून प्रश्नांची भूमी उभी करतो आहे. त्यावर उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून बाबासाहेबांना या कविता संग्रहामध्ये त्यांनी 'शिखर- पुरुष' म्हटलेले आहे. विज्ञानमातृक बुद्ध ही सांगितला आहे.   कवी इथल्या जहरी क्षितिजावर उभा असून वास्तवाच्या सागराला, त्याच्या प्रत्येक हालचालीला, प्रश्नवाचक संवादाने, उरातल्या पेटलेल्या आगीने, आपल्याला आलेल्या अनुभूती, जाणीवेतून, जागृत असलेल्या संवेदना घेऊन, दुष्काळग्रस्त प्रदेशातून, आपल्या सहचरी ला प्रमाण साक्षी सोबत घेऊन, जीवनाचे यथार्थ मूल्य जपण्यासाठी, इथल्या हटवादी, भारतमातेचे कुपुत्र, यांचा चेहरा आपल्या कवितेतून उघड करीत, आपल्या आतड्यातली भूक ज...
Article

दु:खीतांचे तिमीर जावो…

आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. येथील ७०% लोक खेड्यात राहतात. खेड्यातील बहुतांश लोक गरीबीचे, दारिद्र्याचे, हलाखीचे, कष्टमय, भटक्या स्वरूपाचे जीवन जगतात, जगत असतात. शहरांप्रमाणे खेड्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सार्वजनीक रस्ते, आरोग्यासाठी दवाखाने, वीज, शिक्षण घेण्यासाठी उच्च दर्जाच्या शाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सार्वजनीक गटारी, रोजगाराच्या सोयी-सुविधा अशा मूलभूत सुविधा नाहीत. यावरून असे लक्षात येते की, किंवा खरे पाहिले तर असे जाणवते की, गरीब, वंचित, दुर्लक्षित, शोषीत, पिडीत, अन्यायग्रस्त, दिन-दुबळे यांना आवाज निर्माण करणार्‍या म्हणजेच ध्वनी निर्माण करणार्‍या साधनांची अडचण, समस्या, अडथळे मुळीच नाही. खरी अडचण, समस्या, त्रास, अडथळे आहे ते म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठ, उच-निच, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद, व्यंग भेद, पोषाख भेद, भाषा भेद अ...
Article

प्रश्नांची मातृभाषा:मानवी सौंदर्याची सूर्यपौर्णिमा

"माणसं संभ्रमित झाले तर एकवेळ समजून घेता येईल पण कवीनं संभ्रमित होण्याची कोणतीही सोय कवी या शब्दात नाही. माणसं वीझली तर तेही एकवेळ समजून घेता येईल, पण कवीच विझणं कवि या शब्दालाच मान्य नाही. माणसं बेजबाबदार झाली तर एकवेळ समजून घेता येईल पण कवी या शब्दाच्या अर्थामध्ये कोणत्याही बेजबाबदारपणा बसतच नाही. त्यांन असंत्याच्याविरोधात आणि सत्याच्या बाजूने सतत बोलत राहिले पाहिजे. कवीचं हेच जन्म प्रयोजन आहे." कवी यशवंत मनोहर यांनी कवीच्या जीवनाचे नवोनम्षेशन समजून सांगितले आहे. नेमका कवी कोणत्या दिशेने आपला मार्ग धरतो यावर त्याच्या कवीचे यश अवलंबून असते.   कवी युवराज सोनटक्के यांच्या प्रश्नांची मातृभाषा हा कवितासंग्रह मानवी मनाच्या भावविश्वाच्या तळाचा वेध घेत आहे. अग्नीशाळेच्या प्रगल्भ यशानंतर त्याचा हा दुसरा कवितासंग्रह प्रश्नांच्या उकलतेचे नवे क्रांतीसूत्र आहे. सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व सांस्कृत...
Article

कोरा कागद ; निळी शाई..!

पेन मध्ये 'शाई' भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची. ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला 'सहनशील' बनवलं. तो शाई मिळाल्याचा आंनद भारीच होता.आमच्या पिढीने 'आई-बापाचा' कच्चून मार खाल्ला. भरीस भर एकत्र कुटुंबातील काका, काकी, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आज्जा आणि उरला सुरला गल्लीतील मोठ्या माणसांचा. तरीही त्यात 'मजा' होती.   शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर. कोंबडा हो.बेंचवर उभे रहा. अंगठे धर. वर्गाबाहेर उभे रहा. अशा सगळ्या 'शिक्षा' निमूटपणे सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप 'छड्या' खाल्ल्या. यातूनही 'सहनशीलता' वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिउन घेतलेली 'दप्तराच...
Article

धोका वाढत्या तापमानाचा…

* वाढत्या उष्णतेचा आरोग्य, शेती, अर्थकारणा वर परिणाम गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या उन्हाच्या झळा ह्या दुपारनंतरच नाही तर दिवसा उजाडताच सुरु होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून सध्या सूर्य उजाडताच आग ओकतोय अशी अवस्था झाली आहे. १२१ वर्षात यंदाचा मार्च महिना हा ऐतिहासिक ठरलेला आहे. उन्हाळ्याला सुरवात होताच हा महिना सर्वाधिक उष्ण ठरलेला आहे. शिवाय मे महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे   हवामानात वेगाने होत असलेले हे बदल म्हणजे जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. धोका आपल्या अगदी जवळ आल्याचे संकेत परिस्थिती आपल्याला देतेय. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या द़ृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही.    मार्च महिन्यातल्या उकाड्याने १२१ वर्षांचा विक्...
Article

मध्ययुगातील समाजवादी अर्थतज्ञ : महात्मा बसवेश्वर

मध्ययुगात (बाराव्या शतकात) भारतातील सामाजिक सुधारणा आणि परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या विविध समाज सुधारकांमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.मानवतावादी समाजाची उभारणी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना मूठमाती देण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता.प्रस्थापितांच्या विरोधातील हेच बंड तद्दनंतरच्या काळातील समाज सुधारकासाठी प्रेरणास्त्रोत आणि पथदर्शक ठरले आहे.अगदी बालपणापासून सुधारणेचा वसा आणि परिवर्तनाची कास उराशी बाळगणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी अक्षयतृतीयेच्या दिवशी झाला आहे.मादलांबीका आणि मादीराज हे त्यांचे माता-पिता.वडील मुळातच श्रीमंत अन अग्रहाराचे प्रमुख असल्याने गरिबाचे जिने त्यांच्या वाट्याला फारसे आल...
Article

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास प्रारंभ केली.याच दिवशी युधीष्ठरा...
Article

महाराष्ट्रातल्या ‘हुनर’बाज महिला उद्योजक

निर्जीव वस्तूंमध्ये जिवंतपणा आणण्याची किमया जर कोणी करू शकत असेल तर तो म्हणजे एक कलाकार!आपल्या कलेच्या परिसस्पर्शाने हा कलाकार कधी एका निर्जीव कागदावर रेखाटलेल्या चित्रालाही बोलतं करतो.. तर कधी मातीतून घडवलेल्या शिल्पालाही आपलंसं करतो..तर कधी एका साध्या दगडातही जीव आणतो...अशाच एकापेक्षा एक सरस किमया, लीलया साकारल्या आहेत आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कलाकारांनी! आणि या कलाकारांची ही कला पाहण्याची संधी जिथे मिळाली, जिथे या कलाकारांचं हुनर बघता आलं, ते ठिकाण म्हणजे 'हुनर हाट'!  आपल्या देशातल्या या अस्सल कलाकारांची ही हुनर जगासमोर यावी, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेले हे एक उत्तम व्यासपीठ!केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने मुंबईत यंदाचं 40 वं हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात ...
Article

भारतीय कामगार चळवळ…

भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले.यांचे एक हुशार, निष्ठावान, तरुण तडफदार, कर्तृत्ववान सहकारी, दीनबंधू पत्र यशस्वी, समर्थपणे चालवणारे, संपादक, झुंजार पत्रकार, स्वतःच्या जीवनातील सुखाची पर्वा न करता, कामगारांसाठी झिजणारे, कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे.१९ व्या शतकात प्रथम सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे. मुंब‌ईतील मांडवी भागात नारायण लोखंडे हे एका कापड गिरणी मध्ये भांडारपाल म्हणून काम करत होते. तिथे त्यांना १३ - १४ तास काम करावं लागत होतं. काम करत तेथील दहशतीला कंटाळून त्यांनी कापड गिरणीतील नोकरी सोडून दिली.आणि स्वतःस कामगार चळवळीत वाहुन घेतले. २३ सप्टेंबर १८८४ रोजी ' बाॅबे मिल हॅंडस् असोशिएशन् ' ही‌ गिरणी कामगार संघटना स्थापन केली. आणि येथुनच खऱ्या अर्थाने भारतीय कामगार चळवळीस सुरुवात झाली.कोणतीही चळवळ ही एका अर...
सौरऊर्जा काळाची गरज…!
Article

सौरऊर्जा काळाची गरज…!

सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीने वाढली आहे.ऊर्जा निर्मिती चे पारंपरिक स्रोत आता संपण्याच्या मार्गावर आहेत…सरपण, शेणाच्या गोवर्‍या, पेंढा हे पारंपारिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपारिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो. सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात...