जलनायक सुधाकरराव नाईक साहेब
आज 10 मे 2022 'जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब' यांचा स्मृतीदिन.बघता बघता सुधाकरभाऊनां जावुन 22 वर्ष झाले. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दु:खद निधनानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे हयात फरक आहे. मा.मनोहरभाऊ नाईक, मा.हरिभाऊ राठोड, मा.संजयभाऊ राठोड, मा.अँड.निलयभाऊ नाईक, मा.प्रदीप नाईक, मा.इंद्रनील नाईक, मा.राजेश राठोड, मा. डॉ. तुषार राठोड, आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच,सभापती, जिल्हा परीषद अध्यक्ष, ते मुख्य मंत्री,राज्यपाल व्हावे लागल्याने सुधाकरभाऊंच्या परिपक्वपणा,संस्कारातुन, अनुभवातून, आणि 'महानायक वसंतराव नाईकसाहेब' यांच...