देहू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरु येथून दिशाला का अटक करण्यात आली आहे. हे विचारण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे असे देखील त्यांनी म्हटले. पूजा चव्हाण प्रकरणी त्यांनी बोलण्यास टाळले. त्या देहू येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून सरकार चांगले काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे हे व्यापक विचाराचे असून अतिशय चांगले नेतृत्व आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. छोट्या-मोठ्या अडचणी येत असतात. त्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही अतिशय स्थिर आहोत, आमच्यामध्ये सातत्य आहे. त्यामुळे पाच वर्षे पूर्ण करणार अस त्यांनी म्हटले आहे.
पूजा चव्हाण प्रकरणावर त्यांनी बोलण्यास टाळले असून मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे, त्याच प्रमाणे चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर बोलता येईल. असे त्या म्हणाल्या. त्यांनी म्हटले आहे.
Related Stories
July 26, 2024
July 18, 2024