📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

महाकुंभात मृत्यूचा मेळा.!

On: February 9, 2025 1:31 PM
आम्हाला फॉलो करा:
महाकुंभात मृत्यूचा मेळा.!

मौनी अमावस्येनिमित्त गंगातिरी पवित्र शाही स्नान करण्याकरता जमलेल्या भाविकांमध्ये बुधवारी (२८/१/२५) पहाटे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यात अनेकजण गंभीर जखमी असून अनेक८-१० भाविकांचा मृत्यू झाल्याचीही भीती वर्तवली जात आहे.याआधीही कुंभमेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत.प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळाव्यात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी अनेक भाविक संगमावर जाण्यासाठी गर्दी करू लागले. त्यावेळी मोठी चेंगराचेंगरी अनेकांचा मृत्यू  झाला असून भक्तांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भाविकांचा सर्वत्र आक्रोश दिसून आला.
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

१९५४ मध्ये स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज (तेव्हाचा अलाहाबाद) येथे भरवण्यात आला होता. पण या पहिल्याच कुंभमेळ्याला गालबोट लागलं होतं. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरच पवित्र स्नानासाठी अलाहाबाद येथे भाविकांनी गर्दी केली होती. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी संगम घाटावर एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ५०० जणांना आपले प्राण गमवावे लागले.
१९८६ मध्ये हरिद्वारमधील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन किमान २०० लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग हे विविध राज्यांतील अनेक मुख्यमंत्री आणि संसद सदस्यांसह हरिद्वारला आल्यावर हा गोंधळ उडाला होता.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

२००३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नानासाठी हजारो यात्रेकरू गोदावरी नदीवर जमले असताना चेंगराचेंगरीत डझनभर भाविक ठार झाले. चेंगराचेंगरीत महिलांसह ३९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

कुंभ मेळा असो की कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो भक्ताची होणारी गर्दी हा चिंता निर्माण करणारा प्रश्न आहे. भक्तांना कितीही आवाहन करा मात्र या निमित्ताने होणारी गर्दीवर ना प्रशासन ना पोलीस नियंत्रण ठेवू शकते ना भक्त. अशा घटनांपासून सर्वांनी सावध असायला पाहिजे. काही दिवसांपूर्वी तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी होवून अनेक भक्तांचा मृत्यू झाला. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या घोषणानुसार, १९९६ ते २०२२ दरम्यान, देशामध्ये धार्मिक चेंगराचेंगरीत ३,००० हून अधिक लोकांचे प्राण गेले. ही क्षमता स्पष्टपणे आणि मोठ्या मेळावे आयोजित व्यवस्थापित संरचनात्मक संरचनांमध्ये आवश्यकतेनुसार अधोरेखित करते. देशातील कार्यक्रमांमध्ये अशा घटना नवीन नसल्या तरी मंदिर प्रशासन, कार्यक्रम आयोजक,आणि भक्तांनी भूतकाळातील चुकांपासून धडा घेण्यात सातत्याने अपयशी ठरले आहे धार्मिक. सण,सत्संग आणि सभांमध्ये अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते आणि भक्तांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. केन्द्र व राज्य सरकारची अशा घटनाकांसाठी मार्गदर्शक  तत्वे असूनही,सखोल अंमलबजावणी करण्याची करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने योग्य सुरक्षा खबरदारी आणि पूर्व तयारी उपायांची खात्री  करणे आवश्यक आहे. भाविकांनी देखील भावनिक भरलेल्या किंवा उन्माडी परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालणे टाळावे. अशा सामूहिक मेळाव्यात सहभागींनी सावधगिरी बाळगावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ही शोकांतिका सर्व तीर्थक्षेत्रे धार्मिक केंद्रे आणि कार्यक्रमांचे आयोजक आणि भक्तांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक वेकअप कॉल म्हणून काम करेल भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रे आपत्तीचे ठिकाण बनू नये यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत.
– प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment