नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जातात. मग तो देशातल्या राजकीय वादांचा मुद्दा असो किंवा त्यांच्या स्वत:च्याच पक्षातील चुका असोत. त्यावर बोट ठेवण्यात नितीन गडकरी कधीही मागे हटलेले नाहीत. गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असून देशात पेट्रोल दरवाढीची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारबद्दल देशातील सामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असताना आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी त्यावर भूमिका मांडली आहे. गडकरी म्हणाले, देशाला आता दुसर्या पर्यायाची गरज आहे. विजेचा इंधन म्हणून वापर व्हावा, अशी भूमिका गडकरींनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
गेल्या महिन्याभरात किमान १0 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या ८ दिवसांमध्ये तर रोज या किंमती वाढतच आहेत. दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर तर मुंबईत हाच दर ९५.७५ रुपये लिटरपयर्ंत पोहोचला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत पेट्रोलचे दर २ रुपये ९९ पैशांनी वाढले आहेत. तर मुंबईत पेट्रोल तब्बल ३ रुपये २२ पैशांनी महाग झाले आहे. त्यामुळे यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
माझा सल्ला आहे की आता देशाला दुसर्या पर्यायाकडे जाण्याची वेळ आली आहे. मी आधीपासूनच विजेचा इंधन म्हणून वापर करण्याचा प्रसार करत आहे. कारण भारतात अतिरिक्त विजेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याचे ते म्हणाले.
Related Stories
July 26, 2024
July 18, 2024