अमरावती : जिल्ह्य़ात कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सततच्या वाढत्या रुग्णामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिता वाढली असून वाढत्या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत असले तरी बेजबाबदार नागरिकांकडून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे कोरोना रुग्णांचा जिल्ह्य़ात विस्फोट झाला आहे. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हयात सर्वाधिक ४४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून २५ हजार ७४३ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. विशेष म्हणजे चार रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्ह्य़ात ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ हजारपेक्षा जास्त रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २४ हजार ९0 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमरावती जिल्हावासीयांसाठी १५ फेब्रुवारी हा दिवस चिंतेचा ठरला.
सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे प्रशासनासह नागरीक आधिच संकटात असतांना आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ४४९ रुग्णांसह आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठल्यामुळे अमरावतीकरांवर कोरोना संक्रमणाचा कहर पुन्हा कोसळला आहे.
गेल्या १२ दिवसांपासून जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असतांनादेखील जिल्ह्य़ात लग्न समारंभाना उत आला आहे. शहरातील जवळपास सर्वच मंगल कार्यालये वधू-वर याच्यासह वर्हाड्यांनी भरगच्च भरले असून कोरोना संक्रमणाचा धोका अधिक बळावत आहे. प्रशासनाने लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. मात्र, लग्न समारंभ आयोजनावर प्रशासनाकडून मोठय़ा प्रमाणत ढिल देण्यात आल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभात ५0 लोकांची र्मयादित ठेवण्यात आली असतांना देखिल प्रत्येक लग्न समारंभात २00 पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती दिसून येत असल्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढण्याची अधिक भिती आहे. प्रशासनाने काही नियमांसह परवानगी दिली असली तरी लग्नसमारंभामध्ये प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंधन होत असल्याचे उघड उघड दिसून येत असतांना देखिल प्रशासनाकडून या समस्येकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हयात सर्वाधिक ४४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून २५ हजार ७४३ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे चार रूग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्हयात ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ हजार पेक्षा जास्त रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू असून २४ हजार ९0 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
July 26, 2024
July 18, 2024