- बंडूकुमार धवणे
अमरावती : यवतमाळ जिल्यातील दारव्हा तालुक्यातील करजगांव ग्रामपंचायती करीता 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर 18 जानेवारी रोजी निकाल घोषीत झाला असून शिवसेना गटाचे परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत वार्ड क्र. 1 मधून गजानन हरीचंद राठोड, सौ. कविता देवराव राठोड, सौ. शितल कृष्णाजी राठोड, हे तर वार्ड क्र. 2 मधून कृष्णाजी रायसिंग राठोड, रामेश्वर किसनराव चव्हाण, सौ. वंदना खेमराज राठोड आणि वार्ड क्र. 3 मधून संतोष रामरावजी चौधरी, सौ. विना श्रीकृष्ण ठाकरे, सौ.भाग्यश्री गोपाल गावंडे हे विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वांचे लक्ष लागून होते. परिवर्तन पॅनेलने 9 पैकी 9 जागा जिंकून प्रतिस्पर्धी पॅनेलकडून ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली. विजयी उमेदवारांचे गावकर्यांनी अभिनंदन केले आहे. परिवर्तन विजयी पॅनेलचे उमेदवार आपल्या यशाचे श्रेय पालकमंत्री मा. संजयभाऊ राठोड यांना देत आहे. दारव्हा तालुक्यात असंख्य गावात प्रस्थापितांना हादरे बसले तर काही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता बदल झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक ग्रामपचायतीमध्ये स्थानिकांनी नविन चेहर्यांाना संधी दिली आहे. उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे गावात सर्वत्र जल्लोषाचे वातवरण पहावयास मिळत आहे. एकंदर रित्या तालुक्यातील ग्रामपंचायत वर शिवसेनेचे वर्चस्व पहावयास मिळाले.