Friday, April 3

Tag: #उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरे
News

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरेछत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, मनरेगाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या मदतीतून दिवाळीपूर्वी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.उद्धव ठाकरे यांनी हे विधान क्रांती चौकातून सुरू झालेल्या मोर्चा आणि नंतरच्या जाहीर सभेत केले. यावेळी पक्ष नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर नेते उपस्थित होते.ते म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत मिळावी आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारच्या पॅकेजमधील मदत ही ‘सर्वात मोठी म...
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...