Monday, October 27

मद्यपान करताय?

AVvXsEioinIdoF79 1xyLgSDpwznZx1nosrDVsUDEot8jxm6ELIlL7bg6UEQdJzrU9x7K9nB8SVP3cj91mEa7gexwENlg07 MxzmwF7mc67HfgyiYM8I1uRTiJTSLQwbTzl7K9eCD8BUA QHy1WU8xYGFt pvJrqMRzmC90pJdgHCXgKGoSg9EOFau04 GsV=s320

मद्यपान करणं हा आजकाल ट्रेंड बनत आहे. पण कधीतरी केलेलं मद्यपान सवय कधी बनते हे समजतही नाही. मद्यपान सोडल्यानंतर कोणते सकारात्मक बदल होतात याविषयी जाणून घेतलं तर ही घातक सवय सोडणं सोपं जाईल.

सततच्या मद्यपानामुळे शरीरात पाणी आणि अतिरिक्त फॅट्स जमा होतात. दारू सोडल्यानंतर साधारण दोन आठवड्यात फॅट्सचं प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. मद्य सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे शरीरात विषारी द्रव्यं जमा होतात. पणं सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये याचं प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत कमी होतं. झोप न येणं, ताणतणाव अशा समस्या मद्यपानामुळे निर्माण होतात. दारू सोडल्यानंतर या समस्या सुटू शकतात.

दारूमुळे तोंड, यकृत आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दारू सोडल्यास ही शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. मद्यपानामुळे नैराश्याची समस्या निर्माण होते. हे व्यसन सुटल्यास नैराश्य बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतं. दारूमुळे यकृताचं नुकसान होतं. मद्यपान सोडल्यास यकृताचं आरोग्य राखलं जाईल. दारू सोडल्यास डोकेदुखी, स्नायूंचं दुखणं, सांधेदुखीसारख्या समस्या दूर होतात. मद्यपान सोडल्यास हृदयविकाराची शक्यता कमी होते.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply