आंबेडकरी चळवळतील एक संघर्ष पर्व
Original price was: ₹115.00.₹100.00Current price is: ₹100.00.
Description
समाज बदलतो; या बदलाच्या गतिला ज्यांच्या कर्तृत्वाची ऊर्जा रात होते त्यांच्या कर्तृत्वाने समाजाने कृतज्ञता व्यक्त करणे; हे सामाजिक कर्तव्य असते. ही माणसं याच मातीतून उभी झाली. याच मातीत वाढली. आपल्या अचाट कर्तृत्वाच्या बळावर या निळ्या आकाशात विहार करतांना कुठल्याही पदाची, प्रतिष्ठेची आणि पैशाची पर्वा न करता, केवळ या समाजाच्या कल्याणाच्या आणि उत्थानाच्या विचारालाच प्राथमिकता देऊन सतत राबले. लक्षावधी माणसांचे बळ त्यांच्या बाहूत होते; म्हणूनच छातीचा कोट करून इथल्या सार्वभौम सत्तेशी ते लढले. नैसर्गिक हक्क हिरावलेल्या अर्थवंचितांना त्यांच्या न्याय्य हक्काची सनद प्राप्त झाली आणि प्रचंड निष्ठा यापुढे सरकार नमले आणि लक्षावधींच्या हक्काचे पडिक जमीनीचे पटे त्यांच्या नावे झाले.





