मुंबई प्रतिनिधी: नुकताच देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. थोडं हसू तर थोडं आसू असा हा अर्थसंकल्प जरी असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला असल्याचं विरोधी पक्ष सांगत आहे. परंतु आता जनतेला राज्याच्या अर्थसंकल्पाचे वेध लागले असून त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट करता जनतेला आपल्या सूचना करण्याचं आव्हाहन केलं आहे.
त्यांनी ट्विट करताना म्हंटलय ,प्रिय महाराष्ट्र ,आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात साजरा केला जाईल, त्या साठी जोरदार तयारी ही सुरू असून हा अर्थसंकल्प तुमचा आहे त्या मुळे तुमच्या सूचना कल्पना जर काही असतील तर त्या जरूर कळवा अस उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल असून सोबत एक लिंक ही दिली आहे . त्या लिंक वर जाऊन आपण आपले मत आणि काही कल्पना असतील तर जरूर मांडाव्यात ज्या मूळे हा अर्थ संकल्प समाजभिमुख होण्यास मदत ही होईल आणि जनतेला नेमकं काय हवं ?ह्याचा सरकार विचार ही करेल.
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी नक्कीच ह्या अर्थसंकल्पात काही तरी खास असेल अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत असून , नेमकं सरकार आता अर्थसंकल्पात आम वर्गाच्या झोळीत काय टाकणार ही अपेक्षा ही शिगेला पोहचली आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या