- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : युवा कवी संदीप राठोड यांचा नुकताच प्रकाशित झालेला व अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेला ‘भूक छळते तेव्हा…’ या कवितासंग्रहाला जाई फाउंडेशन संचलित तिसर्या शब्दवेल साहित्य संमेलनामध्ये कै. प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती शब्दवेल कबीर सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कवी संदीप राठोड हे मूळ बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील एका छोट्याशा तांड्यातील रहीवाशी असून सध्या ते अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या ठिकाणी स्थायीक झालेले आहे.
यावेळी बोलताना कवी संदीप राठोड यांनी सांगीतले की एका ऊसतोड मजुराच्या मुलाने ‘भूक छळते तेव्हा…’ कवितासंग्रहाच्या माध्यमातून आत्मियतेने मांडलेल्या विस्थापित भटक्या समाजाच्या व्यथा, वेदनांची शब्दवेल साहित्य मंचने दखल घेवून कवितासंग्रहाचा केलेला गौरव आनंद देण्याबरोबर जबाबदारी वाढवणारा व नवनिर्मितीला चालना देणारा आहे.
कवी संदीप राठोड लिखित ‘भूक छळते तेव्हा…’कवितासंग्रहाला शब्दवेल कबीर सन्मान पुरस्कार मिळताच निघोज ग्रामस्थ, पारनेर साहित्य साधना मंच तसेच शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–