• Wed. Jun 7th, 2023

कशाला उद्याची बात..?

    कल करे सो आज,आज करे सो अभी …अशी एक जुनी म्हण आहे.खरंच आजचे काम आजच करावे,उद्दावर ढकलू नये. कारण उद्या कोणी पाहिला. आयुष्य कुणालाच माहीत नाही.जन्म आणि मरण हे सगळे विधी लिखीत असते.म्हणूनच माणसाने आनंदी रहावे. मिळालेल्या सुंदर जीवनाचा आनंद लुटावा. सतत चिंता करावी कशाला? जे आपल्या जवळ आहे त्यात समाधान मानावे.जे नाही त्याचा विचार करत बसलो तर दु:खी जीवन जगू नये.

    जीवनाचा प्रवास एखाद्या आगगाडी प्रमाणे असतो.सतत आशेच्या स्टेशनवरून सुटून निराशेच्या स्टेशनवर थांबतो. पण खचून जाऊ नये.हिम्मत आणि जिद्द सोडू नये.यश नक्की मिळेल. आजचा दिवस आपला त्याचा विचार करायचा आणि आनंदी जीवन जगायचं. मी रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून आजच्या दिवसासाठी धन्यवाद देते. उद्दाचा विचार कशाला करायचा….. माणसाने आनंद ध्यावा आणि आनंद घ्यावा, आनंदाची देवाण घेवाण करुन बघा.. आयुष्य सुंदर जगता येईल..

    लाभले आयुष्य जीतके
    ते जगावे चांगले
    पाऊले टाका पुढे
      जे थांबले ते संपले !!
      घेतला जो श्वास आता
      तो पुन्हा ना लाभणे
      माणसाने माणसाशी
      माणसासम वागणे !!
      हर्षा वाघमारे
      नागपूर
      ————–

      तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

      ——————–

      आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

      -बंडूकुमार धवणे
      संपादक गौरव प्रकाशन
      ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *