• Mon. Jun 5th, 2023

कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : लंपी हा आजार फक्त गुरांवर येतो. कोंबड्या आणि माणसांवर त्याचा परिणाम होत नाही. तरीही काही व्यक्ती आजारी कोंबड्यांचे जुने फोटो समाज माध्यमांवर टाकत आहेत. यामुळे समाजात चुकीचा संदेश पोहोचत आहे. याचा परिणाम म्हणून कुक्कुटपालन दरामध्ये घसरण होत आहे. यासाठी नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार संतोष काकडे यांनी केले आहे.

    जिल्ह्यात सुमारे 3 हजार शेतकरी पुरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर चालतो. कमीत कमी किंमतीत सकस आहार देण्याचे काम कुक्कुटपालन शेतकरी करतो. मांसाहारी लोकांना चिकनद्वारे चांगले प्रथिने मिळतात. यातून कोणताही रोग पसरत नसल्याचे अमरावती पोल्ट्री असोसिएशन ने कळविले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *