- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : दरवर्षी 28 जुलै हे जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणुन साजरा केला जातो. नेहरू युवा केंद्र, व यावली शाहिद ग्रामस्थ यांच्या हस्ते जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. निसर्ग म्हटल की आपल्याला सर्वप्रथम आठवते ते म्हणजे झाड, झाडे आपल्याला शुध्द हवा, फळे, औषधी विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. वृक्ष हे पशु-पाणी-मानव या सर्वानाच उपयोगी आहे. म्हणुनच नेहरू युवा केंद्र, अमरावतीचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सतीश वाघमारे यांनी ग्रामस्थांनशी पुर्वनियोजन करून बदाम (फळझाड), कडू बदाम, जास्वंद, (फुलझाड), कडूनिंब, (औषधीयुक्त) वृक्षाचे वृक्षारोपन यावेळी करण्यात आलेत. वृक्षरोपन करण्याकरिता झेड. पी. कॉन्ट्रॅक्टर राजकुमार शंकरपाळे, मिथुन मोहोड, अजिंक्य वाघमारे, राजकुमार मेश्राम, श्री बोराळे, प्रवीण वाघमारे, वैभव खंडारे, श्रीकृष्ण मेश्राम, निलेश मेश्राम, सागर वाघमारे, जय लोणारे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अशा प्रकारे विविध प्रकारची वृक्षाची लागवड या वेळी करण्यात आली वृक्षरोपणा मुळे जमिनिची उन्हाळयात धूप होत नाही, पाणी पातळी वाढते तसेच मानव, पक्षी, प्राणी यांना सावली, फळे, सुध्दा वृक्ष देतात म्हणून छोटासा प्रयोग नेहरू युवा केंद्र, अमरावती व यावली ग्रामस्थांनी केला.