- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता ‘मार्जीन मनी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी त्यात पाच व्यक्तींना लाभ मिळाला आहे.चालू वर्षात दहा प्रस्ताव मंजूरीचे उद्दिष्ट आहे.
नवउद्योजकांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के निधी शासनाकडून घेण्यात येतो. प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावयाचा आहे. लाभार्थ्याला स्वहिस्स्यातील केवळ 10 टक्के निधी भरावयाचा आहे. उर्वरित 15 टक्के निधी ‘मार्जीन मनी’ म्हणून शासनाव्दारे उपलब्ध करून दिला जातो.
सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या विकासात्मक योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.