मैत्री…

    दोन मनांचं मीलन
    जीवनाचं खरं धन;
    मैत्री म्हणजे सुखांची
    मनसोक्त उधळण.
    मैत्रीचं रोपटं जेव्हा
    मनात फुलू लागतं;
    कुबेरी धनही तेव्हा
    क्षुल्लक वाटू लागतं.
    विश्वासाच्या पायावर
    सदैव उभी असते;
    कोणत्याही बंधनात
    मैत्री बंदिस्त नसते.
    संकटांशी लढताना
    वादळ होऊन येते;
    जीवनाच्या लढाईत
    मैत्री तलवार होते.
    सगळ्या नात्यांना आता
    लागले आहे ग्रहण;
    कोणीही कोणाचं नाही
    जुगार झाले जीवन.
    सुंदर जीवनासाठी
    विश्व वाचले पाहिजे;
    विश्व वाचविण्यासाठी
    मैत्री केलीच पाहिजे…!
    – मिलिंद हिवराळे
    बार्शिटाकळी, जि. अकोला