Skip to content वर्षभर ढोर कष्ट करणारे आम्ही
कष्टातून उतराई व्हावं म्हणून
सदैव मालकासमोर मान हलविणारे आम्ही
आज डोळ्यातून आनंदाश्रू ढाळतो
कृतज्ञता व्यक्त करीत सदैव
त्याच्या बरोबर एकनिष्ठ राहतो
पण म्हातारपणी आमच्या वाट्याला
सन्मानाचं मरण कधीच आलं नाही
आजचं जग प्रामाणीक राहीलं नाही
आहेत जू झुगारून उठाव करणारे
स्वत:च्या क्षणीक सुखासाठी
पण आम्हालाही वाटतं बोललं पाहिजे
का होऊन जगावं आम्ही नित्य षंढं ?
आम्हालाही भावना अन् पुरुषार्थ आहे
त्यासाठी आम्ही कधीच करू नये का बंड ?
म्हणून आम्ही बंड करणार नाही
पण आम्ही एक तक्रार जरूर मांडणार आहे
उद्यापासून मालकाशी करार करणार आहे
कोणतंही नियमबाह्य काम करणार नाही
करारानुसारच पुढचं काम चालणार आहे
आमची चर्चा संपते आणि पोळा फुटतो
सर्व बैल आपापल्या घरी जातात
उद्यापासून पुढील पोळ्यापर्यंत पुन्हा तेच जगणं
सालं,उठाव करण्याचं राहूनच जातं
पुढच्या पोळ्याला पुन्हा चर्चा होईल,
आवेषात उठावाच्या फैरी झडतील
पुन्हा एकमेकांना पाय मारून पाडतील,
सर्वच पश्चाताप करतील,चर्चा करतील,
पुढच्या पोळ्याची वाट बघत घरी निघून जातील….
मात्र पुढे काहीच होत नाही !
Post Views: 71
Like this:
Like Loading...