• Fri. Jun 9th, 2023

राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्टला होणार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवार, दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी लोकअदालतीसमक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी केले आहे.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले लोकअदालतीसमक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याशी संपर्क साधावा.

    मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दि, 6, 8, 10, 11 व 12 ऑगस्ट या कालावधीत यासंबंधी विशेष मोहीम (Special Drive) राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी लोकअदालतीत आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत. अशी माहिती अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *