• Sun. May 28th, 2023

किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी पवनीत कौर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधितांनी ती पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे, ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    अमरावती जिल्ह्यातील ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर ‘सूचना-घोषणा’ (अनाऊन्समेंटस्) शीर्षाखाली प्रसिध्द करण्यात येत आहेत. या यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी. त्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नर- ई-केवायसी न्यू हा पर्याय निवडून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *