- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : मनपा शाळा क्रमांक 14 वडाळी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत थोर पुरुषांच्या ते स्वागत करून करण्यात आले.
मनपा शाळा क्रमांक 14 वडाळी येथे यावर्षीपासून इंग्रजीमध्ये माध्यम सुरू करण्यात आले असून इयत्ता पहिली मध्ये ज्या पालकांनी मुलांना प्रवेश दिला आहे त्या मुलांना शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांना वंदन करून, तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी टीका लावला त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सदर मुलांना पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांच्यां हस्ते नवीन मुलांना चॉकलेट वाटप केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक प्रदान केले सर्वात शेवटी सावित्रीबाई फुले यांनी या सर्व गुलाम शाळेच्या आत मध्ये प्रवेश करून दिला अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे नवख्या व अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
इयत्ता पहिली तील नवीन विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशानुसार शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 2 अन्वये शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमतेची तपासणी करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अभ्यासाबाबत शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.