• Mon. Jun 5th, 2023

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू – शिक्षणमंत्री

    मुंबई : परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १0वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३0 लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील कोरोना आणि परीक्षा असं दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावं लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावले.त्यांचे म्हणणं आम्ही ऐकून घेऊ.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *