मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमिक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निबर्ंध लागू होत असल्याचे नमूद केले आहे. या आदेशानुसार १0 जानेवारीपासून हे नवे निबर्ंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निबर्ंध लावण्यात आले आहेत. याशिवाय केवळ लसीचे दोन डोस घेणार्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे.
पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपयर्ंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५0 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २0 लोकांना उपस्थित राहता येणार. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५0 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपयर्ंत बंद राहणार. यात केवळ १0 वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणार्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार. केशकर्तनालये ५0 टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचें पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १0 ते सकाळी ७ वाजेपयर्ंत बंद राहतील. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निबर्ंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
प्राणिसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १0 ते सकाळी ८ वाजेपयर्ंत बंद असणार. इतरवेळी ५0 टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १0 ते सकाळी ८ वाजेपयर्ंत बंद असणार. इरवेळी केवळ ५0 टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
जगभरात ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमियक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमिक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणार्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्हि किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या