Header Ads Widget

अंकिता जळीतकांडाचा पाच फेब्रुवारीला निकाल

    हिंगणघाट : हिंगणघाट येथील प्रा. अंकिता जळीतकांड प्रकरणात शुक्रवारी सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत्या ५ फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्‍जवल निकम यांनी दिली.

    शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू झाला. दोन वाजता न्यायालयीन कामकाज पूर्ण झाले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्‍वास अँड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केला.

    प्राध्यापिका अंकिता हिची दोन फेब्रुवारी २0२0 ला निर्घृण हत्या करण्यात आली होती.१0 फेब्रुवारी २0 ला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे याच्यावर भारतीय दंड विधाननुसार आरोप निश्‍चित केले होते. या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज सुमारे दोन वर्ष चालले. कोविड काळातही न्यायालयीन काम सुरू ठेवण्यात आलेले होते. सरकारी पक्षातर्फे अँड. उज्ज्वल निकम आणि अँड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला तर बचाव पक्षातर्फे अँड. भूपेंद्र सोने, अँड. शुभांगी कोसारे (कुंभारे),अवंती सोने आणि सुदीप मेर्शाम यांनी सहकार्य केले. या प्रकरणात येत्या पाच तारखेला निकाल येणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या