• Mon. Jun 5th, 2023

समाजकल्याण विभागाची वसतिगृहे सुरू करण्यास हिरवा कंदील

    पुणे : सामाजिक न्याय मंत्रालयाच्या समाजकल्याण विभागाची वसतिगृहे सुरू करण्यास अखेर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हिरवा कंदील दिला आहे. सोमवारपासून (२४ जानेवारी) राज्यातील विविध विभागांत असलेली वसतिगृहे सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांमधील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक न्याय विभागातर्फे चालवण्यात येणारी वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे विद्यार्थी कुठे जाणार, असा प्रश्न होता. विद्यार्थी वसतिगृहांमधून जात नाहीत, हे पाहून विभागाच्या अधिकार्‍यांनी अनेक वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या विरोधात पुण्यातील तसेच इतर अनेक विभागांमधील वसतिगृहांमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पुण्यातील ह्यस्टुडंट हेल्पिंग हँड या विद्यार्थी संघटनेने वसतिगृहे बंद ठेवण्याच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. वसतिगृहात राहणा?्या विद्यार्थ्यांनीच आंदोलनाचा बडगा उगारल्याने अखेर समाजकल्याण विभागाला माघार घ्यावी लागली असून, वसतिगृहे सुरूच ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे आता सोमवारपासून ही वसतिगृहे सुरू ठेवली जाणार आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *