▪️मराठी साहित्याला यशाच्या शिखरावर पोचविण्यासाठी दलित साहित्याचा फार मोलाचा वाटा आहे. अनेक आंबेडकरी कवी, साहित्यिक, लेखकांनी आपल्या लेखणीला प्रतिभेची धार देऊन उपेक्षितांचे हुंकार, आर्त तळमळ, समस्या आणि मानव म्हणून जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष तसेच विद्रोह आपल्या काव्यातून समाजापुढे ठेवून गावकुसाबाहेरील समाजाला जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. नव्हे एक चळवळच उभी केली आहे. या चळवळीला मोलाचा हातभार लावण्याचे कार्य माझे कवी मित्र, ललित लेखक व समीक्षक श्री. प्रशांत ढोले सर यांनी केलेले आहे. यांचा 'अलर्ट" हा कवितासंग्रह वाचण्यात आला. 'अलर्ट' म्हणजे 'दक्ष' कवीने आपल्या काव्यातून समाजाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या काव्यसंग्रहाला प्रा. डॉक्टर मंगेश बनसोड सर यांची प्रस्तावना लाभली असून माजी शिक्षण सहसंचालक श्री. भाऊ गावंडे, महाराष्ट्र शासन यांनी ब्लर्ब दिले आहेत.
▪️ समाजाचे भान ठेवून समाजातील उपेक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी धडपडणारी आर्त हाक त्यांच्या काव्यात दिसून येते. तसेंच कवींचे या कविता संग्रहात विविध भाव दिसून येतात. काही कविता क्रांतीचा विचार करताना दिसतात तर काही कवितेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना दिसून येते. पाण्याचे विविध रूपे अतिशय मार्मिकपणे कवीने आपल्या काव्यात अंतर्भूत केले आहे.
▪️'चवदार पाणी' या कवितेत विविध स्वरूपात पाण्याची रूपे आपल्याला बघायला मिळतात.. मानवाच्या नसानसात, समानतेच्या संग्रमात, मानवी जीवन सुंदर कराया उपयोगी असणारे पाणी आहेत हे निश्चित.
▪️ कवींनी पावसाची विविध रूपे काव्यात वर्णिले आहे. 'पावसाचा आता" या कवितेत
हा आशावाद व्यक्त होताना दिसतो. तसेच पावसाला 'प्राणसखा होता येत नाही, आस दावतो अन कोरडाच निघून जातो,' ही खंत त्यांच्या कवितेत दिसून येते. मानवतेच्या पावसाचे स्वप्नही त्यांनी आपल्या कवितेत परंपरागत रूढींवर टीका करत फार सुंदर मांडलेले आहे. 'पाऊस म्हणजे' या कवितेत,
अशी आर्जव करताना दिसतात. "असा पडतो पाऊस" या कवितेत - परंपरेचा पाऊस मानवी जीवन कसे विदीर्ण करतो आणि प्रस्थापित रूढी, प्रथा, परंपरेचा पाऊस उपेक्षितांच्या वस्त्यांवर कसा हल्ला करतात याचे वास्तव चित्रण आपल्या काव्यातून केले आहे ' कधी बरसणार मानवतेचा पाऊस....!!' ही संवेदनशील जाणीव मनाला स्पर्श करून गेली.
▪️ "जीवनयुद्ध 'या कवितेत लढणे हे महत्त्वाचे आहे हरणे किंवा जिंकणे नाही, असा मोलाचा सल्ला देतात., 'प्रेम म्हणजे' या कवितेत प्रेमाचे अतिशय संयंत रूपातून महत्व पटवून दिले आहे.
कवींच्या -'आई, आजी, भाकर आणि पाऊस', रमाई, या कविता मनाला स्पर्श करून जातात.
या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या. आईची थोरवी यथार्थपणे वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत. तसेंच
▪️ कर्मठ रूढी प्रधानता जपणारे लोक परत भिमरत्न जन्मास येऊ नये याची खबरदारी घेतात.... परत माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरवता कामा नये म्हणून आपण अलर्ट राहिले पाहिजे, असा इशारा 'अलर्ट' या कवितेतून कवीने दिला आहे.
▪️ 'क्रांतीचा विचार बुद्धाचा आचार' यांना कवीच्या जीवनात विशेष स्थान असल्याचे दिसून येते. कवींच्या बर्याच कविता बुद्ध विचाराने प्रेरित आहेत... इतकेच नव्हे तर त्यांच्या जीवनात मनात बुद्ध विचारास आगळेवेगळे स्थान आहे.
▪️ गौतम बुद्धाप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी कवीच्या रोमारोमात अंतर्भूत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी वर्णन करताना कवीची लेखणी वेगळ्याच तेजाने प्रसवते आणि "भीमराव" ही तेजस्वी काव्यरचना जन्म घेते-
'भीमा' या कवितेमध्ये लोकांप्रती काहीसा निराशाजनक सूर किंवा मनातील खंत म्हणा प्रतिबद्धीत होते पण डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेले विचार संविधान लेखन सूर्य समान तसेच तेजस्वी आहेत हे लेखबद्दलही होते.
▪️कवींनी आपल्या कविता संग्रहात आणखी एक भावना प्रकर्षाने मांडलेले आहे ती म्हणजे मैत्रीची! मैत्री हा कवीला विशेष भावलेला विषय दिसून येतो. 'मैत्री' या कवितेत मैत्रीचे ऋणानुबंध विश्वासावर टिकून असते हे सांगताना कवी म्हणतात,-
▪️ कवी प्रशांत ढोले यांच्या बऱ्याच कविता अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा विरुद्ध वाचा फोडताना दिसतात. यासाठी प्रकाशाला त्यांनी आव्हान केलेले दिसते,
अतिशय मार्मिक विधान केलेले आहे.'कालची जखम' ही कविता - भावनाशून्य लोकांची भाराभार झाली l अशी शोकांतिका ही व्यक्त करते.'माझ्या शब्दांनो' या कवितेत शब्दांना विनवणी करतानाही कवी दिसतात. 'मैत्री असते गीत' मनाला अतिशय भावणारे कविता आहे. 'भीमराव' या कवितेत अतिशय मोजक्या शब्दात बाबासाहेबांची कहाणी कवींनी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे.
▪️ कवी प्रशांत ढोले यांचा 'अलर्ट' हा कवितासंग्रह विविध भाव दर्शवितो अनेका भावनात्मक विषयाला हाताळतो, समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा तुमचे विदारक चित्रण करतो म्हणूनच तो वाचनीय आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या