पैलू पाडले तरी चकाकत नाही कर्तृत्वाचे हिरे
सूर्याची किरणं नेमानं
कोण ठेवतय झाकून सातत्यानं..?
टिन-टपरांनी
बघ कित्ती वधारलाय आपला भाव
भंगारी आणतात
रत्नांच्या वखारी सांभाळण्याचा आव...
सोने जाळूनही
का होत असावा नुसताच कोळसा...
कापणीचे विळे
किती वर्षांपासून घासले नाहीत आपण..??
आपल्या
त्याग-समर्पण-निष्ठांच्या त्रिरत्नांचे
अवमूल्यन कुणी केले..?
हाच संशोधनाचा विषय.. !!
-------------------------------------------------■संजय ओरके
0 टिप्पण्या