• Sun. May 28th, 2023

बिचारे बोकड(काव्यमय गोष्ट)

    फिरताना जंगलात
    भूक लागली कोल्ह्यास
    एक हरीण मेलेले
    सुरू केले रे खाण्यास
    मांस खाल्ले पटापट
    बघा काय ते घडले
    दिन उन्हाचे कडक
    सुके नरडे पडले
    शोधू लागला विहीर
    जीव कासाविस झाला
    उडी मारली पाण्यात
    नाही विचारही केला
    होती तहान जेवढी
    पिला पाणी मग कोल्हा
    वाट दिसेना वरती
    खूप केला हल्ला गुल्ला
    वर दिसता बोकड
    लावी त्यास लाडीगोडी
    बुद्धी बोकडांची मंद
    त्याने ही मारली उडी
    बोले बोकडास कोल्हा
    भिंतीकडे पाठ कर
    तुला बाहेर काढण्या
    जातो मी प्रथम वर
    केली लबाडी कोल्हयाने
    गेला वरती चढून
    दिला बोकडास दगा
    गेला पाण्यात सोडून
    श्री.युवराज गोवर्धन जगताप
    काटेगाव ता : बार्शी
    जिल्हा: सोलापूर
    8275171227

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *