• Tue. Sep 26th, 2023

परिवर्तन

    करुणेच्या सागराला अश्रू दान देत
    आतून कोरडी होत जाणारी नदी
    आणि माझं दुःख मला घेऊन जात आहे विनाशाकडे
    दया क्षमा शांती आता कुठेही उरली नाही माझ्यात
    ठरवूनही होता येत नाही मला बुद्ध
    स्वतःच्या आत्म्याचा खून करून,
    माझी जीभ,हात आणि विचार करताहेत आता युद्धाची भाषा
    संपवून टाकावंस वाटतेय आता स्वतःलाच,
    अंतरातम्याशी लढता लढता
    तेंव्हा माझे दोन पिल्ले महिंद्रा संघमित्रा
    दया क्षमा शांतीचा संदेश घेऊन डोकावतात माझ्यात
    आणि गंभीर मुद्रा धारण केलेल्या माणसाच्या गालावर फुलवतात हास्य
    जग म्हणतात अजून थोडं आमच्या साठी
    डोळ्यात अश्रू आणि गालावर हास्य घेऊन
    लढत रहा म्हणतात स्वतःच्या दुःखाशी
    हे युद्ध थांबवण्यासाठी…
    हे बुद्धा तुझा तो धम्म मला अजूनही कळला नाही रे
    मी गुंतून पडलोय माझ्याच दुःखाला खत पाणी घालत
    आणि माझ्या अंगणातला बोधी ज्ञानवृक्ष उन्मळून पडत आहे हवेच्या झोक्याने
    हे बुद्धा गरज आहे पुन्हा एकदा धम्म चक्र प्रवर्तनाची
    पण यावेळेस धर्म , जात, पंथ बदल करून होणार नाही माणसांच्या माणुसकीत परिवर्तन
    गरज आहे धम्म क्रांतीची जिची मशाल
    पेटली पाहिजे प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात
    आणि जाळून टाकल्या पाहिजेत सर्व जाती
    प्रतिकात्मक रावण जाळून आता होणार नाही काहीही उपयोग
    आता स्वतःच स्वतःला जाळले पाहिजे
    आतून बाहेरून राख होण्यासाठी
    कुठल्याही स्त्री ची अभ्रू न लुटणारा रावण जाळला जातो आज भर चौकात
    आणि हजारो घरे उध्वस्त करून
    आया बहिणींची इज्जत वेशीवर टांगणारे फिरतायेत मोकाट, गावागावात घराघरात
    आणि आपण निर्भया साठी मेणबत्ती पेटवून मोकळे झालो
    बा भीमा तू पुन्हा ये परिवर्तन घडवायला,
    माझं वर्तन घडवायला…
    सुरेश पेंढरवाड
    वणी जि.यवतमाळ
    9623595312

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,