• Sat. Jun 3rd, 2023

परिवर्तनवाद

क्रांतीज्वालेच्या दिशेनं
निघालेल्या परिवर्तनवादी
समुहांना अन्यायकारी
षडयंत्रकारी यंत्रणेनं
दाबण्याची जी कवायत
केली जात आहे
ती लोकशाहीला घातक आहे.
सायबरच्या बनावट खेळात
लोकशाहीवादी विचारवंताचा
आवाज दाबणे म्हणजे
सत्तामुजोराचे वैफल्य आहे.
आदिवासी,शोषित,गरीब व वंचित
समूहाची लढाई न्यायाने लढने
हे क्रांतीकारी कार्य आहे.
या लढाईतील परिवर्तनवादी लाट थोपवनं
पुनरुज्जीवनवादी तत्वांना शक्य नाही.
परिवर्तनचा सुर्योदय
रात्रीच्या काजव्यांनी
उजाडायचा थांबत नाही.
स्टेन स्वामीची डेथ ही एक इंस्टिट्यूशनल डेथ आहे.
मानवी न्यायाची अहवेलना आहे.
क्रांतीच्या परिवर्तनवादी पांखरानो
मानवमुक्तीचा संग्राम पुन्हा लढायचा आहे.
संविधानात्मक विचारन्यायातूनच
उद्याचा सूर्य उजाडणार आहे.
कारण परिवर्तनवाद हाच
निसर्गाचा एल्गार आहे.
संदीप गायकवाड
 नागपूर
 ९६३७३५७४००

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *