मुंबई : मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वार्यांनी वेग पकडला आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून पुढे वाटचाल केली. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये मान्सूनने दिमाखात आगमन करत मुंबईकरांची पुरती तारांबळ उडवली आहे. असे असले तरी अद्याप मुंबईकरांवरचे पावसाचे सावट कमी झाले नाही. आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असेल असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. पुण्यात आजचा दिवस वगळता पुढील चार दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा यावषीर्चा सर्वात मोठा सलग पाऊस असणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आजपासून रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, र%ागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घाटावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील आजपासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024