• Sat. Jun 3rd, 2023

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हय़ांमध्ये जाण्यासाठी ई-पास बंधनकारक

जालना : सोमवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्हय़ांमध्ये अनलॉक केले आहे. त्यानुसार चार गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये दहा जिल्हे असून सर्व सुरू राहणार आहे. दुसर्‍या गटामध्ये दोन जिल्हे आहेत.
जिथे ५0 टक्के व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यामध्ये नंदुरबार आणि हिंगोली या दोनच जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ तिसर्‍या गटामध्ये १५ जिल्हय़ांचा समावेश आहे आणि या जिल्हामध्ये दुसर्‍या जिल्हय़ातून येणार्‍या प्रवाशांना ई-पास शिवाय प्रवेश द्यायचा किंवा नाही याचे अधिकार त्या-त्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
मात्र उर्वरित चौथ्या गटातील आठही जिल्हय़ांना त्या जिल्हय़ामध्ये प्रवेश करण्यासाठी ई पास अत्यंत आवश्यक आहे आणि ते जिल्हे आहेत बुलडाणा, रायगड, र%ागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर यांचा समावेश आहे.
जालना पोलिस अधीक्षक कार्यालयातून सुमारे ४२ हजार नागरिकांनी ई पासची मागणी केली होती. त्यामध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना हे पास नाकारण्यात आले. त्यांची संख्या २६ हजार एवढी आहे. तर साडेसोळा हजार प्रवाशांना हे पास मंजूर करण्यात आले आहेत आणि सुमारे १६ हजार ३00 प्रवाशांनी या पासचा उपयोग करून प्रवास केलेला आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *