• Mon. Jun 5th, 2023

दहा मानाच्या पालख्यांचा ‘लाल परी’तून होणार प्रवास

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी पायी वारीसाठी राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. मात्र, केवळ मानाच्या दहा पालखी सोहळ्यांचा आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील १0 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार आहे.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील १0 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपयर्ंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना, विश्‍वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्‍वस्त करावे, अशा सूचनाही परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी दिल्या आहेत. या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकर्‍यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेच प्रवासादरम्यान वारकर्‍यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही अनिल परब यांनी सांगितले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *