Header Ads Widget

भय इथे संपत नाही

अंधार दाटला मृत्यूचा
जिंदगीच उरली नाही
आता होता कसा गेला
भय इथे संपत नाही ।।

अंधार काळ रात
डोळ्यात निघून गेली
आक्रोश आसवांत
 सरणात लीन झाली ।।

सांगू कुणाला वेदना
मृत्यूचे तांडव पाहून
मुक्या झाल्या जखमा
विरहाचे गीत गाऊन ।।

शास्वती जिंदगीची
शून्यवत झाली
मुरद्यांच्या सोबतीने
मज जग आली ।।

म्हणतात सगळे
हे माझे माझे
सोडून नकळत जाती
जीवनाचे ओझे ।।

 * राजेंद्र क. भटकर
बडनेरा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या