अमरावती:राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असतांना अमरावती मध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णामध्ये देखिल दोन दिवसापासुन घट पहावयास मिळत असुन रिकव्हरी रेट आणि मृत्यू दरामध्ये सुधारणा पहावयास मिळत आहे. ५ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात २४१ कोरोनो रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयाने आज ५0 हजार कोरोना रुग्णांचा आकडा ओलाडला आहे.४६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३ हजार एॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसुन आतापर्यत ६८७ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे.
देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असुन तज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार मे पर्यत या लाटेमध्ये मोठया प्रमाणात रुग्ण वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग, हात धुने व लसीकरण अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासरख्या अनेक शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाटयाने वाढत असतांना अमरावती जिल्हयात मात्र कोरोना रुग्णांचा आकडा हा सध्यास्थितीत तरी स्थिरावल्याचे दिसून येत आहे.
मृत्यूचे प्रमाण देखिल कमी झाल्यामुळे नागरिक तसेच प्रशासन यांची चिता कमी झाली होती.मात्र राज्य शासनाने निर्बंध अधिक कडक केल्यामुळे जनसामान्यांनी या कडक निर्बंधला विरोध दश्रीविला आहे. विशेष म्हणजे जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या ही आज कमी जरी असली तरी या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता मोठया प्रमाणात दिसुन येत आहे. कारण बाजारेपठा तसेच इतर ठिकाणी नागरिक वावरत असतांना त्यांच्या कडून प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात २४१ कोरोनो रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयाने आज ५0 हजार कोरोना रुग्णांचा आकडा ओलाडला आहे.४६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३ हजार एॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसुन आतापर्यत ६८७ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे.