• Sun. May 28th, 2023

महाराष्ट्राला आठवड्याला ४0 लाख लसींचा पुरवठा करा-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:देशात सध्या लसीकरण सुरू असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे आठवड्याला ४0 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच दिवसाला सहा लाख लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करायचे असेल तर लोकांनाही सहकार्य करण्याची गरज बोलून दाखवली. यावेळी त्यांनी मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे असेही सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सहा लाखांच टार्गेट पूर्ण करायचे असेल तर लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. गावागावात न घाबरता लसीकरण झाले पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहे. मुस्लीमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहेत. मुस्लीमांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील व ते ही लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे. महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त केली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *