• Tue. Jun 6th, 2023

भय इथे संपत नाही

अंधार दाटला मृत्यूचा
जिंदगीच उरली नाही
आता होता कसा गेला
भय इथे संपत नाही ।।
अंधार काळ रात
डोळ्यात निघून गेली
आक्रोश आसवांत
सरणात लीन झाली ।।
सांगू कुणाला वेदना
मृत्यूचे तांडव पाहून
मुक्या झाल्या जखमा
विरहाचे गीत गाऊन ।।
शास्वती जिंदगीची
शून्यवत झाली
मुरद्यांच्या सोबतीने
मज जग आली ।।
म्हणतात सगळे
हे माझे माझे
सोडून नकळत जाती
जीवनाचे ओझे ।।
* राजेंद्र क. भटकर
बडनेरा

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *