चांदूर रेल्वे : महाराष्ट्रसह देशभरात सुप्रसिद्ध व लाखो भाविकांचे र्शद्धास्थान असलेले अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधुत बुवा संस्थानचा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याचे संस्थानतर्फे प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.४00 वर्षांपूर्वी अवधूत पंथ स्थापना करणारे श्री. कृष्णाजी अवधुत महाराजांच्या पावन सावंगा (विठोबा) नगरीत गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भक्तांचा जनसागर लोटत असतो.
देशातील लाखो भक्त कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन लाखो रुपयांचा कापूर जाळून आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच समतेचे प्रतिक देव व भक्तांच्या ७२ फुट उंच झेड्यांना पदस्पर्श न करता नवीन खोळ चढविण्याचा भव्य, दिव्य, चित्तथरारक धार्मिक विधी लाखो भाविक आपल्या हृदयात जपुन ठेवतात. दरवर्षीप्रमाणे संस्थानच्यावतीने गुढीपाडवा यात्रा १३ एप्रिलला व रामनवमी यात्रा २१ एप्रिल ला आयोजित होती. परंतु, सध्याच्या परिस्थितीनुसार कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रेत येणार्या भाविकांना गदीर्मुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यात्रेत येणार्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून भाविकांना संसर्ग होऊ नये म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी यांच्या ५ मार्च च्या आदेशान्वये व संस्थानची १३ मार्च रोजी झालेली खास सभा अन्वये संस्थानमधील संपूर्ण यात्रा महोत्सव स्थगित करण्यात येत आहे. संस्थान शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असून, कोरोनाविषाणू च्या वाढत्या प्रादुभार्वामुळे श्री विठोबा संस्थानचा गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आल्याचे संस्थानतर्फे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले. तरी भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वामनराव रामटेके, सचिव गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, विश्वस्त हरिदास सोनवाल, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, विश्वास रामटेके, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी आदींनी केले आहे.