मुंबई : कोरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निबर्ंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून आदेश लागू झाले असून, ३0 एप्रिलपर्यंत कडक निबर्ंध राहणार आहेत. याच कालावधीत भारतर% डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.
राज्यात ३0 एप्रिलपर्यंत कडक निबर्ंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असे सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझे आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मागील वर्षीही कोरोनाचे थैमान सुरू होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला आंबेडकरी जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यंदा पुन्हा आंबेडकर जयंती तोंडावर असतानाच राज्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. त्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.