मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले असून कोणाचीतरी विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांना हटविण्याची मागणी जोर धरत होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती. या सार्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपयर्ंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत हायव्होल्टेज बैठकी सुरु होत्या. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करणार असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. परमबीर सिंग यांना गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचसोबत रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे पोलीस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर बुधवारी याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे. रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Related Stories
April 19, 2024
April 16, 2024