अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत काही शिथीलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, कोरोनाची साथ वाढू नये म्हणून सर्वांकडून ह्यकोविड अँप्रोप्रिएट बिहेव्हिअरचे पालन काटेकोरपणे होणे आवश्यक असून, ते न पाळणार्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिला.संचारबंदीत शिथीलता आणून दुकानांना परवानगी देणारा आदेश जिल्हाधिकार्यांनी आज जारी केला. ६ मार्च सकाळी ६ वाजतापासून अमरावती महापालिकेचे क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण क्षेत्रात लागू होईल. आरोग्य, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आदी अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू राहतील. इतर शासकीय कार्यालयात १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात, असे आदेश आहेत. लग्नसमारंभासाठी केवळ २0 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. मात्र, या व्यक्तींनी शक्यतो अँटिजेन टेस्ट करून घेण्याच्या सूचना आहेत. वधू किंवा वर यांचे घर किंवा घराच्या परिसरात लग्नसमारंभ आयोजित करता येईल. तिथे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर न झाल्यास आयोजकाला २0 हजार रुपए दंड ठोठावण्यात येईल. लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यासाठी महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांना, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकार्यांना व इतर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.मालवाहतूक व वाहतुकीला निबर्ंध नाहीत. तथापि, चारचाकी गाडीत चालकाव्यतिरिक्त ३ प्रवासी, तर तीनचाकी गाडीत (ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह २ प्रवाश्यांना प्रवासाची परवानगी आहे.ठोक भाजीमंडईत पहाटे २ ते सकाळी ६ या कालावधीत व्यवहार होतील, मात्र, तिथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024