मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी निराशजनक आणि मागच्याच योजना या अर्थसंकल्पात समाविष्ट केली असल्याची आणि भाजपाच्याच घोषणा उचलल्या असल्याची टीका केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर काय भाजपाची मक्तेदारी आहे का? असा प्रतिसवाल करत भाजपावर निशाणा साधला आहे. अजित पवारांचा भाजपावर निशाणाअर्थसंकल्प मांडणे आमच्या समोर नवे नाही. कर रुपाने येणारे पैसे कमी झाले आहे. केंद्राकडून अद्यापही ३२ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. मार्च अखेर पर्यंत तो द्यावा अशी सर्वच राज्याची मागणी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेसात हजार कोटीचा कार्यक्रम आम्ही राबवतो. पोस्ट कोविडसाठी काळजी घेत उपायोजना या अर्थसंकल्पातून केला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी घर खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली. असल्याचेही पवार म्हणाले. ग्रामीण भागात महिला राहात नाहीत का? शेतकर्यामुळे आपला जीडीपी टिकून राहिला आहे. म्हणून शेतकर्यांसाठी ३ लाखापयर्ंत शून्य टक्के दरांने पीक कर्ज वाटप करणार, शेतकर्यांसाठी १५ हजार रुपये वीज बिल भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित कोली. तरुणांच्या बाबतीत २ वर्षात कौशल विकास कार्यक्रमातून ५ हजार रुपये देणार आहोत. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रवास योजना, सीएनजी १५00 बसेस एसटी महामंडळाला देणार. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचवण्याची सोय करणार. हायब्रीड सीएनजी बसमुळे पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही. राखीव पोलिस दल स्वतंत्र महिला गट स्थापन करणार असल्याचेही अर्थसंकल्प अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. जागतिक महिला दिनी हे अर्थसंकल्प सादर होत असताना महिलांसाठी विशेष तरतूद केलीय. घर घेताना मुद्रांक शुल्कात २0% सूट दिली आहे. घरकाम करणार्या महिलांना करीत संत जना बाईंच्या नावाने असलेल्या योजनेला अडीचशे कोटी आपण दिलेत.
शेतकर्यांमुळे ८% जीडीपी राहिलेला आहे. सर्व्हिस सेकटर मध्ये जबरदस्त फटका बसला आहे, त्यामुळे शेतकर्यांसाठी 0 टक्के व्याजाने ३ लाखापयर्ंत पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे व्याज आम्ही भरणार आहोत. कर्जमुक्ती दिली, आता कर्ज काढा मुद्दल भरा व्याज आम्ही भरतो हाय निर्णय आम्ही घेतला आहे. वीज बिल बाबत १५ हजार रुपयच भरा, बाकी माफ केला. नवीन वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करणार आहोत. एक मेडिकल कॉलेज सुरू झाले की ७00 बेडचे रुग्णालय सुरू होतात, त्याचा फायदा जनतेला होईल. फसवं विज्ञान लोकांना सांगून दिशाभूल करायची, हे होऊ नये म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा म्हणून ३00 करोड ची वार्षिक तरतूद करतोय. विदर्भ मराठवाडा विकास महामंडळ केली नाही, असं ते म्हणतायत त्यांना राजकारण करायचे आहे , त्यांचे त्यांना लखलाभ असे. लोकसंख्येनुसार विदर्भातील २३ मराठवाड्याला १८ उर्वरित महाराष्ट्राला ५८% मिळाले असते. त्यांना आम्ही प्रदेश निहाय वाटनची टिपणी दिली आहे. २६% विदर्भला दिले आहेत, ३% अधिक दिलेलंत, त्यांच्यापेक्षा अधिक आम्ही दिलेत. प्रदेशनिहाय वाटपाचे पैसे दिले आहेत, त्यांनी पहावे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024