ठाणे : मुलं दत्तक घेताना वंशाला दिवा हवा ही प्रचलित संकल्पना आता मागे पडलेली दिसते आहे. आता बहुतेक जोडप्याचा कल हा मुलींनाच दत्तक घेण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. २0२0 मध्ये १४ मुलांना तर २१ मुलींना दत्तक देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे. तर प्रतीक्षेत असलेल्या १६४ जोडप्यापैकी ७५ जणांनी मुलींसाठी आणि ५0 जोडप्यानी मुलांसाठी अर्ज केला आहे. तर महत्वाचे म्हणजे कोरोना काळातही ३५ बालके दत्तक देण्यात आली असून त्यांना हक्काचे घर आणि मायेचा आसरा मिळाला आहे.
लग्नाचे वाढलेले वय, बदललेली जीवनशैली तणाव आणि त्यामुळे आलेल्या शारीरिक व्याधीमुळे संतती सुखापासून वंचित राहणार्या जोडप्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टरी उपचारात लाखो रुपये खर्च केल्यानंतरही जेव्हा पदरी निराशा पडते तेव्हा एक आशेचा किरण म्हणून दत्तक मुलाचा पर्याय समोर येतो. पण डॉक्टरी उपचारापेक्षाही कायदेशीर प्रक्रिया किचकट असल्याचा अनुभव अनेकांना येत असून ही परीक्षा पास केल्यानंतरही ठाण्यातील १६४ जोडपी अजूनही दत्तक बालकाच्या प्रतिक्षेतच असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान कोरोना काळातही ३५ बालके दत्तक देण्यात आली असून त्यांना हक्काचे घर आणि मायेचा आसरा मिळाला आहे.
अनाथ आर्शमात असलेली मुले दत्तक देताना गैरप्रकार थांबवावेत म्हणून केंद्र सरकारने ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. सद्यस्थितीत ठाणे जिलत दत्तक देणार्या नेरुळ आणि डोंबिवलीत दोन संस्था आहेत. या संस्थामध्ये बालके दत्तक घेण्यासाठी २0२0 मध्ये सुमारे २00 जोडप्यांनी अर्ज केले. पण कोरोनाचे संकट त्यात ओढावल्याने आतापयर्ंत केवळ ३५ अनाथांना मायेचा आसरा मिळाला आहे. यामध्ये १४ मुले आणि २१ मुलींना दत्तक देण्यात आले आहे. तर आपण कधी आईबाबा होणार या प्रतीक्षेत १६४ जोडपी आहेत. तर ठाणे जिल्हय़ात गेल्या पाच वर्षभर २२५ अनाथ मुलांना दत्तक देण्यात आले आहे. २0१६ मध्ये ४७, २0१७ मध्ये ३७ , २0१८ मध्ये ४८, २0१९ मध्ये तब्बल ५८ तर २0२0 मध्ये ३५ अनाथ मुलांना दत्तक योजनेमुळे माया करणारे आईबाबा मिळाले आहेत.