• Sun. May 28th, 2023

६ रुग्णाचा मृत्यू, ४६१ कोरोना पॉझिटिव्ह

ByGaurav Prakashan

Mar 12, 2021

अमरावती : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढत असुन त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा अमरावती जिल्हयातही पहावयास मिळत आहे. ११ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४६१ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४१ हजार २८३ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ५ हजार पेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून ३४ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६ रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यत ५८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम हा महाराष्ट्र राज्यावर सर्वाधिक झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.त्यातही अमरावती जिल्हयामध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे राज्यासह देशाचे देखिल लक्ष अमरावती जिल्हयाकडे केंद्रीत झाले आहे.अमरावती जिल्हयात मागिल १ महिन्यापासुन कोरोना रुग्णांचा आकडा हा झपाटयाने वाढत असुन याव अंकुश लावण्यासाठी प्रशासनाने ८ मार्च पर्यत लाकडाऊनची घोषणा केली होती. मात्र लॉकडाऊन शिथील करून निर्बंध लावण्यात आले.विशेष म्हणजे वातावरणातील बदलाचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर पहावयास मिळत आहे. सर्दी,खोकला, ताप अशा सारख्या समस्या या सहज झाल्यामुळे जिल्हयातील जवळपास सर्वच रुग्णालये ही रुग्णांनी तुडूंब भरलेली दिसून येत आहे. ११ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४६१ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४१ हजार २८३ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ५ हजार पेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून ३४ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *