• Mon. May 29th, 2023

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी मुख्य अभियंता सुचित्रा गुजरसह अधिकारी, कर्मचारी फिल्डवर

ByGaurav Prakashan

Mar 12, 2021

अमरावती : आवाहन,विनंती करूनही थकित वीज देयकांचा भरणा न करणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश मुख्य अभियंता अमरावती परिमंडल सुचित्रा गुजर यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे. एवढेच नाही तर स्वत: मुख्य अभियंता आपल्या अधिकारी कर्मचार्‍्यासह वीज पुरवठा खंडित करण्यासाठी फिल्डवर उतरल्याने परिमंडलात आजपासून वीज पुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहिम सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या कारवाईदरम्यान कोणी अडथळा आणत असेल किंवा महावितरण कर्मचार्‍यांना मारहानीचे प्रकार घडले तर त्यांच्यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे. वीज बिल भरायचे नाही तर वीजही मीळणार नाही अशी नाईलाजास्तव भूमिका अमरावती परिमंडलात घेतली आहे. महावितरणने वीज ग्राहकांना संकटाच्या काळातही अखंडित सेवा देण्याला प्राधान्य दिले,एवढेच नाही तर सध्यास्थितीत महावितरणचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने, उपलब्ध कर्मचार्‍यांवर अतीरिक्त पदभार देत रात्रं-दिवस अखंडित वीज पुरवठा करण्यात येतो. शिवाय महावितरणही वीज निमीर्ती कंपन्यांची एक ग्राहक आहे. त्यामुळे वीजबिलाची वसूलीच झाली नाही तर ग्राहकांना लागणारी वीज कशी घ्यायची आणि कसा चालेल महावितरणचा व्यवहार याचा ग्राहकांनी विचार करायला हवे. परिमंडलातील घरगुती ,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ३ लक्ष ७१ हजार ग्राहकांकडे २४७ कोटी १५ लक्ष रुपए थकले आहे. ग्राहकांना महावितरणच्या आर्थीक परिस्थितीची माहिती देण्यात आली,विनंत्या,आवाहने करून वीजबिल भरून सहकार्य करायला सांगीतले , पण तसे झाले नाही.त्यामुळे ग्राहकांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारवाई दरम्यान बिल भरू पाहणार्‍या ग्राहकांचे पैसे न स्विकारण्याच्या सुचना दिल्या असल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा हा खंडितच होणार हे निश्‍चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *