• Thu. Sep 28th, 2023

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सामना

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना शुक्रवारी खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे दोन बदल होऊ शकतात.
पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांना दुखापत झाली आहे. श्रेयस गंभीर दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर रोहितलाही दुखापत झाली असून त्याच्या खेळण्याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन जागा रिक्त आहेत. श्रेयसच्या जागी यावेळी सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांचा विचार केला जाऊ शकतो. कारण श्रेयसच्या चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आता भारताला एक चांगला फलंदाज हवा आहे. सूर्यकुमार यादव हा सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला यावेळी पहिली पसंती मिळू शकते. कारण मधल्या फळीत सूर्यकुमार यांगली फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर रिषभ पंतच्या नावाचीही यावेळी जोरदार चर्चा आहे. कारण पंत हा भारतीय संघाकडून बर्‍याचदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आहे. त्यामुळे या स्थानावर खेळण्याचा त्याला जास्त अनुभव आहे. त्यामुळे आता श्रेयसच्या जागी सूर्यकुमार आणि रिषभ यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रोहितची दुखापत गंभीर नसली तरी त्याला दुसर्‍या सामन्यासाठी विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यावेळी शिखर धवनबरोबर सलामीला कोण येणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. भारतीय संघात शुभमन गिल हा युवा सलामीवीर आहे. त्यामुळे त्याला यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे. गिलने आतापर्यंत कसोटी सामन्यात भारताच्या सलामीची जबाबदारी पार पाडली आहे. पण जर गिलला विचार केला जात नसेल तर लोकेश राहुल यावेळी सलामीला येऊ शकतो. कारण राहुलने यापूर्वी भारताची सलामीची जबाबदारी निभावलेली आहे. त्यामुळे जर गिलचा विचार झाला नाही तर राहुल हा सलामीला येऊ शकतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,