या पृथ्वीतलावर तुझ्याकडेच ती नैसर्गिक शक्ती देणगी आहे. विचार करण्याची. सर्वात बुद्धीमान प्राणी तुच आहेस. तरीही..अविचारीपणाने वागतोस. वा..रे..वा मानलं तुला कशासाठी भौतिक सुखासाठी .आपल्याच बांधवांना फसवतोस, लुबाडतोस, भांडतोस वेळप्रसंगी मारतोस सुद्धा. इतका क्रूर बनत चाललास की माणसालाच माणसाची भीती वाटू लागली. शेवटी जीवन हे क्षणभंगूर आहे. हे लक्षात ठेव. आठव त्या शांततेच्या दूताला, महापुरूषांच्या विचाराला. ते विचारच आनंदाने जगायला, लढायला प्रेमाने वागायला शिकवतील. चांगला विचार नेहमीच प्रगतीकडे घेऊन जाणारा असतो आणि वाईट विचार अधोगतीकडे आता तूच ठरव. पक्ष्यांचच बघ ना ना कुठली शाळा,ना कुठली परीक्षा काही नसतानाही किती आनंदाने जगतात एकत्र राहतात अगदी मनसोक्तपणे. जीवन हे एकदाच मिळतं. राग,द्वेष, मत्सर बाजूला ठेवून माणूस म्हणून जगता येईल का ते बघ. नक्कीच तू विचार करशील. माणसातली माणूसकी जिवंत ठेव.सगळीच माणसे सारखी नसतात काही खूप विचारी असतात. प्रेमळ असतात. आनंदाने जगतात व इतरांना आनंद देतात. आपणही त्यांच्या सहवासात राहून आनंदाने जगू आणि इतरांनाही जगू देऊ. माणूस आहोत ही जाणीव मनामध्ये सतत ठेवू. बघ विचार कर………
- अजय बनसोडे
- मु.दापेगाव ता औसा जि लातूर