नवी दिल्ली : भारतभरासह महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रसार वेगाने होताना पाहायला मिळत आहे. विदर्भ कोरोनाचे केंद्र बनत असल्याचा दावा महाराष्ट्राचे तांत्रिक सल्लाकार डॉ. सुभाष सांळुखे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, विदर्भापासून संक्रमण मुंबई आणि पुण्यासारख्या इतर ठिकाणी पसरत आहे. जर संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात आले नाही तर देशाच्या इतर भागातही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात जवळपास ८ हजार नवीन कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. मागच्या चार महिन्यात एका दिवसात सर्वाधिक केसेस समोर आल्याचे दिसून आले आहे. अधिकार्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आता कोरोनाचे २१, २१११९ केसेस समोर आल्या आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही हे सांगणे कठीण आहे. विदर्भाप्रमाणेच नागपूर, अमरावतीपासून औरंगाबाद कोरोनाचे केंद्र बनले आहे. वेळीच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आले नाही तर इतर राज्यात कोरोना पसरू शकतो.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना पसरण्याची तीन कारणे समोर आली आहेत. व्हायरसची संरचना, उत्परिवर्तन क्षमता. दुसरी संक्रमित व्यक्ती जी इतरांना संक्रमित करू शकते. तिसरे पर्यावरण आणि संरचना, प्रदूषण. सुभाष साळुंखेंनी सांगितले की, व्हायरसाचा आलेख चढचा उतरता पाहायला मिळतो. कोरोना व्हायरसच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरस म्यूटेट होत आहे किंवा नाही हे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने दिल्लीत विदर्भातील आठ जिल्ह्यांतील नमुने पाठवले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्थितीपासून बचाव करण्यासाठी नवीन योजना आखावी लागणार आहे. सध्याच्या काळात लॉकडाऊन हा अंतीम उपाय दिसून येत आहे. संपर्क, ट्रेसिंग, चाचण्यांमध्ये वाढ आणि रुग्णांना क्वारंटाईन करणे हा मुख्य मार्ग आहे. ज्यामुळे व्हायरसचा प्रसार रोखता येऊ शकतो.