चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील र%ापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीच्या ट्रकला भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच वराती जागीच ठार झाले आहे तर २0 जण गंभीर जखमी झाले.
सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक पलटी झाल्यानंतर चाके वर झाली.
यामध्ये सर्वजण अडकले दरम्यान चार जणांचा जागीच अंत झाला. त्यामध्ये रघु कोराम (४१) एकारा, साहिल विनोद केराम (१४), कविता संजय बोरकर (३५), लीना भास्कर गहाणे (२७) यांचा समावेश आहे. अंजली घनशाम गहाणे ही लहानगी मुलगी या भीषण अपघातात बचावली. मात्र तिची आई लीना जागीच ठार झाली. या ट्रक मध्ये एकूण ५0 वर्हाडी बसले होते, त्यात २0 गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेनंतर ड्रायव्हर फरार झाल्याची माहिती आहे.
Related Stories
September 28, 2023